Thursday, July 04, 2024 11:30:10 AM

धनंजय मुंडेंची आव्हाडांवर टीका

धनंजय मुंडेंची आव्हाडांवर टीका

बीड, ०७ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : प्रभू रामचंद्र यांच्याबद्दल बोलताना जितेंद्र आव्हाड कशा अवस्थेत होते ते पाहावे लागेल. शब्द माघार घेतल्यानंतर ते कुठल्या अवस्थेत होते हे पाहिले पाहिजे. ते शुद्ध होते का? एखादा माणूस बेशुद्ध अवस्थेत काहीतरी बडबड करतो आणि शुद्ध आल्यावर वेगळं बोलतो. ती अवस्था कोणती होती हे पाहावे लागेल. देव सर्वांचा आहे. धर्म वेगळा आहे. प्रभू रामचंद्र काय खात होते, आव्हाड साक्षीदार आहेत का ? त्यांच्या आजोबाला तरी माहीत आहे का ? असं भाष्य करताना आव्हाड यांची अवस्था तपासायला पाहिजे. त्यांच्या सहकाऱ्यांना विचारले पाहिजे.


सम्बन्धित सामग्री