नंदुरबार, १९ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी: धनगर समाजाला आदिवासींमध्ये आरक्षण देऊ नये. त्यासोबत विविध २१ मागण्यासाठी शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्यावतीने गेल्या आठ दिवसापासून नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू आहे. मात्र उपोषणकर्त्यांच्या मागण्यांकडे सरकार आणि प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत गटाच्या वतीने उपोषण स्थळी आदिवासी परंपरेप्रमाणे अंत्यविधीसाठी वापरल्या जाणाऱ्या तुर वाद्य वाजत सरकार आणि प्रशासनाचा निषेध केला आहे.