नवी मुंबई, १८ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी: धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करुन समाजाला आरक्षण द्यावं, या मागणीसाठी धनगर समाजातर्फे पदयात्रा काढण्यात आली. कळंबोली ते कामोठे ही पदयात्रा काढण्यात आली. मागील ५० वर्षांपासून धनगर समाज अनुसूचित जमातीच्या आरक्षणासाठी लढा देत असून सरकार दुर्लक्ष करत आहे. सरकारने धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी न लावल्यास मतदानाच्या माध्यमातून धनगर समाज येत्या निवडणुकीत शासनकर्त्याना धडा शिकवेल असा एल्गार या पदयात्रेत करण्यात आला.