पालघर, १७ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी: मराठा समाजाला देण्यात आलेले तीस लाख कुणबी जात प्रमाणपत्र बेकायदेशीर आहेत. असा आरोप पालघर मधील ओबीसी एल्गार मेळाव्यात कुणबी सेनेकडून करण्यात आला आहे. सरकारने जरांगेंच्या दबावाला बळी न पडता दिलेले दाखले त्वरित रद्द करावे अशी मागणी कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील यांनी केली आहे. यावेळी दिलेल्या दाखल्यांविरोधात आंदोलन छेडणार असल्याचाही इशारा दिला आहे.