बारामती, १६ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी: केंद्र सरकारने उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मिती वरी बंदी घातली होती. मात्र साखर कारखानदारांकडून आणि शेतकऱ्यांकडून या निर्णयाला विरोध झाल्याने केंद्र सरकारने इथेनॉल निर्मिती वरील बंदी अखेर आठ दिवसांनंतर उठवलेली आहे. आता साखर कारखान्यांना इथेनॉल निर्मितीसाठी उसाचा रस आणि बी हेवी मोलासिस दोन्ही वापरण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. या निर्णयाचे साखर कारखानदार आणि शेतकऱ्यांनी स्वागत केले आहे.