नाशिक, १५ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी: गेल्या महिन्यातील २६ नोव्हेंबर रविवार रोजी दुपारी गारपीट आणि वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने द्राक्षांची पंढरी म्हणून ओळख असलेल्या निफाड तालुक्यातील द्राक्ष आणि कांद्याची नगरी म्हणून ओळख असलेल्या लासलगाव येथील कांदा पिक उध्वस्त झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना द्राक्षांना एकरी दोन लाख रुपये, टोमॅटो, मिर्ची यांना ५० ते ६० हजार रुपये, कांद्याला १ लाख रुपये अशी भरघोस मदत करा. अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने तीव्र मोठे आंदोलन उभे केले जाईल असा सरकाराला इशारा देण्यात आला.