Wednesday, July 03, 2024 01:26:08 PM

ऊस दर आंदोलन पेटलं

ऊस दर आंदोलन पेटलं

सांगली, ११ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी: सांगली जिल्ह्यातल्या ऊस दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. तब्बल वीस तासांपासून सांगलीतील दत्त इंडिया संचलित वसंतदादा साखर कारखान्यासमोर राजू शेट्टी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांसह ठाण मांडून आहेत. रात्रभर राजू शेट्टी यांनी कार्यकर्त्यांसह कारखान्याच्या समोर मुक्काम केला. तर स्वाभिमानीच्या ठिय्या आंदोलनामुळे कारखान्याचे गाळप ठप्प झाले आहे. जिल्हा प्रशासनाकडून १६ डिसेंबर रोजी पुन्हा बैठकीचा प्रस्ताव देण्यात आला आहे. मात्र आधी दत्त इंडियाने एफआरपी जाहीर करावी, अशी भूमिका घेत तो पर्यंत आंदोलन थांबणार नसल्याची भूमिका घेतली आहे.


सम्बन्धित सामग्री