सिंधुदुर्ग, १० डिसेंबर २०२३, प्रतिनिधी: मंत्री दीपक केसरकरांनी पुन्हा एकदा नारायण राणेंवर स्तुतीसुमनं उधळली आहेत. केंद्रिय मंत्री नारायण राणे यांच्यासोबत माझे वैचारिक भांडण होतं. जे लोक मनाने मोठे असतात ते भांडण फार काळ सुरू ठेवत नाहीत. तसंच राणेंनी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर निधी दिला आहे. असं वक्तव्यदेखील केसरकरांनी केले आहे. तळकोकणातील राणे - केसरकर राजकीय वाद नव्हता तर तो वैचारिक वाद होता. असं वक्तव्य राणेंना भेटल्यानंतर दीपक केसरकर यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं. आता पुन्हा दोडामार्ग येथे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर स्तुतीसुमन उधळून राजकीय संघर्ष संपून एकत्र आल्याच पुन्हा वक्तव्य केलं आहे.