Thursday, July 04, 2024 09:03:43 AM

काँग्रेसची शेतकरी संवाद यात्रा

काँग्रेसची शेतकरी संवाद यात्रा

अमरावती, १० डिसेंबर २०२३, प्रतिनिधी: सध्या नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू असून सोमवारी काँग्रेसचा विधानभवनावर हल्लाबोल मोर्चा असून त्यानिमित्त अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथे काँग्रेसची शेतकरी संवाद यात्रा काँग्रेसचे आमदार बळवंत वानखडे त्यांच्या नेतृत्वात निघाली होती. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, स्वामीनाथन आयोगसह आणि अमरावती जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी राज्य सरकारने ठोस पावलं उचलावी. अशी मागणी काँग्रेसने केली आहे. दरम्यान सोमवारी अमरावती जिल्ह्यातून हजारो काँग्रेस कार्यकर्ते मोर्चात सहभागी होणार आहेत. अशी माहिती काँग्रेस आमदार बळवंत वानखडे यांनी दिली आहे.


सम्बन्धित सामग्री