संभाजी नगर, ०८ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी: छत्रपती संभाजी नगर मध्ये कोळी बांधवांचा विराट मोर्चा निघाला आहे. जिल्ह्यातील अजिंठा डोंगर रांगेतील दुर्गम भागात वास्तव्य करणाऱ्या महादेव कोळी आणि मल्हार कोळी या आदिवासी समाज बांधवांना कोळी नोंदीवरून जात वैधता प्रमाणपत्र मिळावे या मागणीसाठी हजारो समाज बांधवांचा मोर्चा निघाला असून हा मोर्चा थेट जात पडताळणी कार्यालयावर धडकणार आहे. मराठवाड्यातील हजारो आदिवासी कोळी बांधव घोषणा देत हातात फलक आणि पिवळे ध्वज घेऊन या मोर्चात सहभागी झाले आहेत.