नाशिक, ०७ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : गेल्या आठवड्यात नाशिक जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटमुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. सर्वाधिक नुकसान हे द्राक्ष बागांचे झाल्याची माहिती समोर आलेली आहे. तर या सर्व नुकसानाबाबत सरकारकडे अंतिम अहवाल सादर होणार आहे. नाशिक जिल्ह्यात ३४ हजार ९५२ हेक्टर वरील पिकांचे नुकसान झालेले आहे. सर्वांचे लक्ष आता सरकारकडून मिळणाऱ्या मदतीकडे आहे.
महत्त्वाचे मुद्दे -
नाशकात अवकाळी, गारपिटीचा फटका
सर्वाधिक फटका द्राक्ष बागेला
नुकसानीचा अंतिम अहवाल सरकारकडे सादर
सरकारच्या मदतीकडे सर्वांचं लक्ष