पनवेल, २३ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा वायाळ येथील पंप बिघडला आहे. या पंपाच्या दुरुस्तीचे काम करण्यासाठी पाणीकपात करण्यात येणार आहे. पंपाच्या दुरुस्तीसाठी गुरुवार २३ नोव्हेंबरपासून आठ ते दहा दिवस दररोज तीस ते चाळीस टक्के पाणीकपात केली जाणार आहे. करंजाडे, डेरीवली, वडघर, विचुंबे, उसर्ली, बेलवली-वारदोली, नांदगाव, कुडावे या गावांसह, सिडको महामंडळ, पनवेल महापालिका, बेलापूर रेल्वे प्रशासन, वीज महावितरण कंपनी यांना पाणीकपातीचा फटका बसणार आहे.