पंढरपूर, ०३ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरातून गेल्या तीन दिवसापासून एसटी बस सेवा बंद होती. त्यामुळे वारकरी व विठ्ठल भक्तांना याचा मोठा फटका बसला. मात्र मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर शुक्रवारपासून एसटी सेवा पूर्ववत झाली आहे. परिणामी वारकरी विठ्ठलभक्तांना एसटी सुरू झाल्याने दिलासा मिळाला आहे. पंढरपूरचा साधारणपणे २०० फेऱ्या दररोज असतात. यातून किमान ३० ते ४० हजार विठ्ठलभक्त दर्शनासाठी येतात. या सर्व विठ्ठल भक्तांना आता एसटी सेवेमुळे अधिकचा आनंद झाला आहे.