हिंगोली, १ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : मराठा आरक्षणासाठी आणखी एक आत्महत्या झाली. गोविंद कावळे नावाच्या २१ वर्षांच्या तरुणाने आत्महत्या केली. नहाद गावातील गोंविदने गावातील एका विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्याआधी त्याने एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. ही चिठ्ठी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. चिठ्ठीत 'मी शिक्षणापासून वंचित राहिलो. महाराष्ट्र शासन आम्हाला मराठा आरक्षण देत नाही, म्हणून आत्महत्या करत आहे' असे लिहिले आहे. पोलिसांनी गोविंदचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढून पंचनामा करण्यासाठी पाठवला आहे. आत्महत्येप्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.