जळगाव, १० ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी पिंडदान आंदोलन केले. हे आंदोलन जळगावमध्ये करण्यात आले. केळी उत्पादक शेतकऱ्यांनी पीक विमा आणि नुकसान भरपाईच्या मागणीसाठी आंदोलन केले. पिंडदान करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राज्य सरकारचा निषेध केला.
जिल्हा प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे ७८ हजार केळी उत्पादक शेतकरी पीकविमा नुकसान भरपाई पासून वंचित राहिले आहेत. या शेतकऱ्यांना कधी न्याय मिळणार, असा सवाल आंदोलन करत विचारण्यात आला.