अमरावती, १० ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : २०२४ ची लोकसभा निवडणूक जवळ येऊन ठेपलेली आहे. अमरावती उपविभागीय अधिकारी व निवडणूक अधिकारी अनिल भटकर यांच्या नेतृत्वात निवडणूक विभागाने मतदार नोंदणी करण्यासाठी जनजागृती अभियानाला सुरुवात केली. मंगळवारी सकाळी अमरावती शहरातून शालेय विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली. शहरातील मुख्य चौकात पथनाट्याद्वारे मतदार नोंदणी आणि जनजागृती अभियान राबविण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी "मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो", "मतदार राजा जाग तू शहाणा सारखा वाग तु" अशा प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या…