Thursday, July 04, 2024 10:22:42 AM

लातूरच्या कल्पना गिरी हत्याकांडाचा निकाल

लातूरच्या कल्पना गिरी हत्याकांडाचा निकाल

लातूर, ०९ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : लातूर येथील युवक काँग्रेस कार्यकर्त्या कल्पना गिरी यांच्या हत्येप्रकरणी निकाल आला आहे. दोन मारेकऱ्यांना आजन्म कारावास आणि प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड झाला आहे. उर्वरित चार सहआरोपींना तीन वर्षाचा सश्रम कारावास आणि तीन हजार हजार रुपये दंडाची शिक्षा झाली आहे. लातूर जिल्हा न्यायाधीशांनी हा निर्णय दिला आहे. महेंद्रसिंह चौहान आणि समीर किल्लारीकर या दोघांना आजन्म कारावास झाला आहे. प्रभाकर शेट्टी, सुवर्णंसिंह ठाकूर, विक्रम सिंह चौहान, कुलदीप ठाकूर या चौघांना तीन वर्षाचा सश्रम कारावास झाला आहे. जिल्हा न्यायाधीश आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. बी. रोटे यांनी हा निकाल दिला.

काय आहे प्रकरण ?

लातूर विधानसभा युवक काँग्रेसच्या सरचिटणीस कल्पना गिरी या २८ वर्षांच्या होत्या. वकिलीचे शिक्षण घेतलेल्या कल्पना यांनी काँग्रेसमधून राजकीय कारकिर्द सुरू केली होती. अल्पावधीतच त्यांना राजकारणात ओळख मिळाली. लातूरच्या राजकारणात त्यांची चर्चा होऊ लागली. पक्षातील अनेक बडे नेते त्यांना फोन करू लागले, त्यांच्याशी संपर्क ठेवू लागले. हीच बाब स्थानिक पदाधिकाऱ्यांना खटकत होती.

विलासराव देशमुख यांचे पुत्र आमदार अमित देशमुख यांचा २१ मार्चला वाढदिवस असतो. त्यांच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन करण्यासाठी लातूरमध्ये काँग्रेस पदाधिकाऱ्यांची लगबग सुरू होती. २०१४ ला वाढदिवसाच्या निमित्ताने वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. याच कार्यक्रमासाठी कल्पना गिरी आपल्या घरून स्कुटीवरून निघाल्या. पण त्या पुन्हा घरी परतल्याच नाहीत. त्यांच्या कुटुंबीय-नातेवाईकांनी दोन दिवसानंतर मिसिंगची तक्रार पोलिसांकडे दिली. चार दिवसांनंतर त्यांचा मृतदेह तुळजापूर पोलिसांना एका तलावाजवळ आढळून आला.


सम्बन्धित सामग्री