सातारा, १४ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : पुसेसावळी हिंसाचारानंतर पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून सातारा जिल्ह्यात इंटरनेट सेवा ७२ तासांसाठी बंद केली होती. परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर पोलिसांनी सातारा जिल्ह्यातील इंटरनेट सेवा पुन्हा सुरू केली आहे. कोणीही जिल्ह्यात अफवा पसरवली, कायदा - सुव्यवस्थेला बाधा येईल असे वर्तन केले तर त्या व्यक्तीची रवानगी तुरुंगात होईल, असे पोलिसांनी जाहीर केले आहे. इंटरनेट बंद ठेवल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यास मदत झाली, अशी माहिती पोलिसांनी दिली.
https://www.youtube.com/watch?v=QJqv46Pw5vA