Tuesday, July 09, 2024 02:35:22 AM

'दुष्काळ जाहीर करा, नाहीतर जनआंदोलन करू'

दुष्काळ जाहीर करा नाहीतर जनआंदोलन करू

धुळे, १४ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : धुळे जिल्ह्यात अत्यल्प पाऊस झाला आहे. पुरेश्या पावसाअभावी शेतीचे नुकसान झाले आहे. ही परिस्थिती समजून घेऊन पीक विम्याची अग्रीम रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात तातडीने जमा करावी. तसेच राज्य शासनाने धुळे जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा. दुष्काळ जाहीर केला नाही, तर जनआंदोलन करू; असा इशारा आमदार कुणाल पाटील यांनी दिला आहे.

आता पाऊस पडला तरी धुळ्यातील शेतकऱ्यांच्या हाती २० टक्के उत्पादन येणे पण कठीण दिसत आहे. ही बाब समजून घेऊन राज्य शासनाने धुळे जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी आमदार कुणाल पाटील यांनी केली आहे.


सम्बन्धित सामग्री