Sunday, July 07, 2024 12:34:52 AM

रस्त्याचा नाही पत्ता, सुरू करणार चहा टपऱ्या

रस्त्याचा नाही पत्ता सुरू करणार चहा टपऱ्या

पनवेल, १३ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : कोकणातील चाकरमान्यांना चांगल्या रस्त्यावरून प्रवासाचा आनंद देणे शक्य नसल्याचे लक्षात आल्याने सरकारने आता एक नवीन उपक्रम सुरु केलाय. मुंबई-गोवा महामार्गावर सुमारे दहा ठिकाणी मंडप उभारून गणेशभक्तांसाठी चहा, सरबत आणि स्वच्छतागृह उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. रस्ता नाही तर नाही, निदान चहा तरी घ्या, असा संदेश देत सरकार भक्तांच्या संतापापासून वाचण्याचा प्रयत्न करत असल्याचे प्रवाशांचं म्हणणं आहे.


सम्बन्धित सामग्री