रायगड, २९ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : रायगड जिल्ह्याच्या किनारपट्टीवर चरसची पाकिटे सापडण्याचे सत्र सुरूच आहे. श्रीवर्धनच्या जीवना आणि मारळ हरेश्वर पाठोपाठ सर्वे समुद्र किनारी चरसच्या २४ बॅग सापडल्या असून त्याचे वजन २६ किलो आहे. आतापर्यंत रायगड जिल्ह्यात तीन ठिकाणी मिळून एकूण ६१ पिशव्या सापडल्या असून त्यात सुमारे ६२ किलो चरस आहे. या पिशव्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. या मालाची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत तीन कोटी रुपये आहे. दरम्यान पोलिसांनी आपली शोधमोहीम अधिक तीव्र केली आहे.