पालघर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा उघड झाला आहे. जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या तब्बल ४४३ शाळांचा वीजपुरवठा वीज बिल थकीत असल्याने खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे या शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी विजे विना शिक्षणाचे धडे गिरवत आहेत. मागील चार वर्षांपासून ७५ लाख रुपयांची वीज बिल थकीत असल्याने या शाळांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे या शाळांमध्ये असलेली विद्युत उपकरणही धुळ खात पडून आहेत.