Thursday, July 04, 2024 09:39:53 AM

poor-management-of-education-department
शिक्षण विभागाचा ढिसाळ कारभार

शिक्षण विभागाचा ढिसाळ कारभार

पालघर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा उघड झाला आहे. जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या तब्बल ४४३ शाळांचा वीजपुरवठा वीज बिल थकीत असल्याने खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे या शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी विजे विना शिक्षणाचे धडे गिरवत आहेत. मागील चार वर्षांपासून ७५ लाख रुपयांची वीज बिल थकीत असल्याने या शाळांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे या शाळांमध्ये असलेली विद्युत उपकरणही धुळ खात पडून आहेत.

        

सम्बन्धित सामग्री