राष्ट्रवादीत आता दोन गट पडले असून दोन्ही गटांमध्ये वार-पलटवार सुरु झाले आहेत. राष्ट्रवादीच्या दोन गटात वर्चस्वाची लढाई सुरु झाली आहे. महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सुरु असलेल्या घडामोडींमुळे सर्वत्रच खळबळ माजली आहे. त्यातच अजित पवारांनी केलेल्या बंडानंतर त्यांनी लगेचच उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. याच पार्श्ववभूमीवर एमईटीमध्ये अजित पवार गटाची बैठक पार पडत आहे. या बैठकीत बोलत असताना अजित पवारांनी जितेंद्र आव्हाडांवर जोरदार टीका केली आहे.
काय म्हणाले अजित पवार?
एमईटीमध्ये अजित पवार गटाची बैठक पार पडत आहे. या बैठकीत बोलत असताना अजित पवारांनी जितेंद्र आव्हाडांवर जोरदार टीका केली आहे. 'ठाण्याच्या पट्ठ्यानं पक्षाचं वाटोळं केलं. आव्हाडांमुळे अनेक नेते पक्ष सोडून गेले.' अशी खोचक टीका अजित पवार यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर केली आहे.