मुंबई : वाशी नाका येथे जलवाहिनी जोडणीच्या कामामुळे २९ मे रोजी सकाळी दहा वाजल्यापासून ३० मे रोजी सकाळी दहा वाजेपर्यंत गोवंडी आणि चेंबूरच्या काही भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे, असे पालिकेच्या वतीने सांगण्यात आले. वाशी नाका येथे ४५० मिलिमीटर व ७५० मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनी जोडण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे पालिकेने पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.