मुंबई : विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतून मनसेच्या अभिजीत पानसे यांनी माघार घेतली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या विनंतीला मान देत मनसेच्या नेतृत्वाने पानसेंना माघार घेण्याचे निर्देश दिले. या आदेशाचे पालन करत पानसेंनी माघार घेतली. या घडामोडीवर वसंत मोरे यांनी एक फेसबुक पोस्ट केली. सध्या या पोस्टची समाजमाध्यमात भरपूर चर्चा सुरू आहे. 'कोकणात जाऊन मासे न खाताच परतले' अशी पोस्ट मोरेंनी केली. या पोस्टवर अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत.