ठाणे : ठाणे स्थानकातील फलाट क्रमांक ५ व ६ च्या रुंदीकरणाचा फायदा एक लाख प्रवाशांना होणार असून, सध्या अरुंद फलाटांमुळे प्रवाशांची होणारी घुसमट, प्रचंड गर्दीने होणारी रेटारेटी कमी होईल. गर्दी विभागली जाईल आणि त्यातून सुटसुटीत प्रवास करता येईल, असा दावा मध्य रेल्वेने केला आहे. रेल्वेचे महाव्यवस्थापक राम करण यादव आणि विभागीय व्यवस्थापक रजनीश कुमार गोयल यांनी शनिवारी ठाणे स्थानकातील कामाची पाहणी केली.