नवी दिल्ली : भारतीय उत्पादनांना चालना देण्यासाठी पाहिलेल्या स्वप्नाचे आता एका शक्तिशाली चळवळीत रूपांतर झाले आहे. त्याचा प्रभाव कायम असून, भारताला आता कोणीही रोखू शकत नाही, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. केंद्र सरकारच्या ‘मेक इन इंडिया’मोहिमेच्या १० व्या वर्धापनदिनानिमित्त पंतप्रधान मोदींनी 'मेक इन इंडिया'शी संबंधित असलेल्या सर्वांचे कौतुक केले आहे.