मुंबई : मुंबई शहर आणि उपनगराला जोडणारा शीव रेल्वे पूल बुधवारी ३१ जुलैच्या मध्यरात्रीपासून वाहतुकीस बंद करण्यात येणार असून येत्या तीन महिन्यांत त्याचे पाडकाम हाती घेण्यात येणार आहे. यासाठी शेवटच्या टप्प्यात दोन मोठे ब्लॉक घेतले जाणार आहेत. पूल जमीनदोस्त करण्यासाठी अजस्र यंत्रसामग्रीचा वापर केला जाणार आहे. शीव येथील रेल्वे पूल पाडण्यासाठी किमान तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. पहिल्या दोन महिन्यांत पुलाचे छोटे-छोटे भाग पाडण्यात येतील.