मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राज्यात महायुतीवर वरचढ होण्याची संधी मविआला मिळाली. या पार्श्वभूमीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत विधानसभेत चित्र बदलण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे राशपचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. चंद्राबाबू नायडू आणि नितीशकुमार यांच्याशी संपर्क साधलेला नाही, असेही शरद पवार म्हणाले.
शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे
देशाचं चित्र बदलण्यात महाराष्ट्राची साथ
निकाल परिवर्तनाला पोषक
देशपातळीवरचं चित्र आशादायी
राशपचं यश निर्णायक
बुधवारी मोदी विरोधकांची दिल्लीत बैठक
चर्चा करुन पुढील निर्णय घेणार
नायडू, नीतीश यांच्याशी चर्चा नाही
बारामतीत योग्य निर्णय लागेल
ध्रुवीकरणाचा प्रयत्न जनतेने नाकारला
जनतेने भाजपाला धडा शिकवला