अमरावती : अमरावती जिल्ह्यात संततधार पावसामुळे मागील ४८ तासात ४ मंडलात अतिवृष्टीमुळे पिकाचं अतोनात नुकसान झालं आहे. मुसळधार पावसामुळे शेत-शिवाराचं तलाव झाल्याचं पाहायला मिळालं. पावसामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट होणार आहे. जिल्ह्यात २४ तासात सरासरी १२.२ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. पावसामुळे कापूस आणि सोयाबीनचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.