नागपूर : दीक्षाभूमीवर काहीही भूमिगत होणार नाही, असे दीक्षाभूमी स्मारक समितीचे सदस्य राजेंद्र गवई म्हणाले. ते जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर विशेष मुलाखतीत बोलत होते. दीक्षाभूमी येथे भूमिगत वाहनतळ बांधणार असल्याचे वृत्त आले. यानंतर नागपूरमध्ये हिंसक घटना घडल्या. अनेकांनी योजनेला विरोध केला आणि सरकारचा जाहीर निषेध केला. या पार्श्वभूमीवर राजेंद्र गवई यांनी विशेष मुलाखतीत भूमिगत बांधकाम होणार नसल्याचे सांगितले.