सोलापूर : महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही, असे मनसे प्रमुख राज ठाकरे म्हणाले. ते सोलापूर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. महाराष्ट्रात नोकरी व्यवसायासाठी भरपूर संधी आहे. यामुळे राज्यात आरक्षणाची गरज नाही, असे राज ठाकरे म्हणाले.
- मनसेचे विधानसभेसाठी दोन उमेदवार जाहीर
- शिवडीतून बाळा नांदगावकरांना उमेदवारी जाहीर
- पंढरपूरमधून दिलीप धोत्रेंना उमेदवारी
राज ठाकरेंची महत्त्वाची वक्तव्ये
राज्यातल्या भूमिपुत्रांना नोकऱ्या मिळाव्यात - राज ठाकरे
समाजाला मूर्ख बनवण्याचं काम सुरू - राज
नोकरी, शिक्षणासाठी जात येते कुठे ? - राज
जातीच्या मुद्द्याला शरद पवारांनी हातभार लावू नये - राज
लोकसभेला पाठिंबा, विधानसभेचं बोललो नव्हतो - राज
विधानसभेला मनसे २०० ते २५० जागा लढवणार - राज
जातीवरून माथी भडकवण्याचा प्रयत्न - राज
राज्याचं मणिपूर होऊ नये - राज
महाराष्ट्रात आरक्षणाची गरजच नाही - राज
राजीव गांधींनंतर मोदींनाच पूर्ण बहुमत - राज
पंतप्रधानांसाठी सर्व राज्य सारखी असावीत - राज
'घटना बदलणार, भाजपा उमेदवाराचे वक्तव्य'
'भाजपा उमेदवारानेच विरोधकांना मुद्दा दिला'
मनसे प्रमुख राज ठाकरेंचे वक्तव्य
मनसेची नवनिर्माण यात्रा
५ ऑगस्ट - सोलापूर
६ ऑगस्ट - धाराशिव
७ ऑगस्ट - लातूर
८ ऑगस्ट - नांदेड
९ ऑगस्ट - हिंगोली
१० ऑगस्ट - परभणी
११ ऑगस्ट - बीड
१२ ऑगस्ट - जालना
१३ ऑगस्ट - छत्रपती संभाजीनगर
राज ठाकरेंच्या वक्तव्यावर प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया
मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे आरक्षणाबाबतचे ताजे वक्तव्य समाजात दुही निर्माण करणारे असे असल्याचे वंचितचे प्रकाश आंबेडकर म्हणाले. प्रकाश आंबेडकर यांनी राज ठाकरेंच्या आरक्षणाबाबतच्या वक्तव्यावर टीका केली.