कोल्हापूर : कोल्हापुरातील सायबर चौकात भरधाव वेगाने आलेल्या गाडीने तीन दुचाकीवरील सात जणांना उडवले. दुचाकींना धडक दिल्यानंतर गाडी उलटली. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आणि सहा जण गंभीर जखमी झाले. अपघातात गाडीचे आणि तीन दुचाकींचे नुकसान झाले. रस्त्यावर काचांचा खच पडला.