मुंबई : टी २० विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा विधानसभेत गौरव होणार आहे. या सोहळ्यासाठी संघाला आमंत्रण देण्यात आले आहे. याआधी २००७ मध्ये भारताने टी २० विश्वचषक जिंकला होता. भारताने २०२४ मध्ये वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला आणि विश्वचषक जिंकला. याआधी २००७ मध्ये भारताने पाकिस्तान विरुद्धचा सामना जिंकून विश्वचषकावर नाव कोरले होते.