भंडारा - जिल्ह्यातील पाथरी येथे विजेच्या कडकडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे घरात दीड ते दोन फूट पाणी साचले, ज्यामुळे दहा ते बाराहून अधिक घरांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली. दोन तास चाललेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, अनेकांचे घरात पाणी शिरल्याने हालअपेष्टा सुरु आहेत. पावसाने पाथरी गावात अत्यंत दुरावस्था निर्माण केली आहे, आणि नागरिकांची मोठी तारांबळ उडाली आहे. प्रशासनाने मदतीचा हात पुढे करण्याची आवश्यकता आहे.