मुंबई : मतदान करताना दहशतवादाला विसरू नका, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. ते मुंबईत शिवाजी पार्क येथे महायुतीच्या सभेत बोलत होते. भाजपाच्या नेतृत्वात राज्यात महायुतीने विकासाला सर्वोच्च प्राधान्य दिले. आर्थिक प्रगतीवर भर दिला. सर्वसमावेशक विकास करण्याला महत्त्व दिले; असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
'काँग्रेसमुळे देशाची आर्थिक व्यवस्था कोलमडली'
'लवकरच भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या स्थानावर असेल'
'मोदीविरोधक निराशेच्या गर्तेत'
'निराशेनं घेरल्यानं विरोधकांना सगळं अशक्यच वाटतंय'
मविआचं सरकार जनमतविरोधी - मोदी
जमनतविरोधी मविआ विकासविरोधीसुद्धा - मोदी
'देशातली पहिली बुलेट ट्रेन मुंबईतून धावणार'
'वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शिक्षण मराठीतून शक्य'
'काँग्रेसचा जाहीरनामा माओवादी'
'काँग्रेससाठी ही अस्तित्वाची निवडणूक'
'काँग्रेसचं लक्ष तुमच्या संपत्तीवर'
'मुंबईच्या विकासाला मविआ खीळ घालेल'
काँग्रेस आरक्षणविरोधी - मोदी