मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसवाले गांधीचे ऐकत नाहीत असे वक्तव्य त्यांनी केले आहे. गांधींनी काँग्रेस विसर्जित करण्यास सांगितले आहे असा शब्दात फडणवीसांनी काँग्रेसवर टीका केली आहे.
गांधी जयंतीला आंदोलन करणाऱ्या काँगीजनांना 'करताय का काँग्रेस विसर्जित ?' असा सवालही उपमुख्यमंत्री फडणवीसांनी केला आहे.