मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून धर्मजागर यात्रेला सुरूवात करण्यात आली आहे. करवीर निवासिनी आई अंबाबाईच्या आशीर्वादाने सुरू यात्रेला प्रारंभ करण्यात आला. महाराष्ट्रात साधूसंतांच्या आवमान होऊ नये. राजसत्तेपेक्षा धर्मसत्ता ही कायमच विशेष उंचीवर राहावी. या संकल्पनेने या यात्रेला सुरूवात करण्यात आली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रेरणेने व डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेना प्रदेशाध्यक्ष अक्षयमहाराज भोसले यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री धर्मजागरण यात्रेचा शुभारंभ करण्यात आला. कोल्हापुरातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते हजारो साधू संतांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.