ठाणे : मध्य रेल्वेमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने रेल्वे खूप उशिराने धावत आहेत. ठाणे रेल्वे स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. भांडुप ते नाहूर रेल्वे स्थानक दरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने मध्य रेल्वे विस्कळीत झाली आहे. कल्याणच्या दिशेने कमी वेगाने धावणाऱ्या सर्वच रेल्वे उशिराने धावत असल्याने ठाणे फलाट क्रमांक दोनवर प्रचंड गर्दी दिसत आहे. भांडुप आणि मुलुंड दरम्यान रेल्वे रूळाला तडा गेल्यामुळे वाहतूक खोळंबली आहे. यामुळे प्रवाशांना सकाळी सकाळी प्रवास करण्यासाठी अडचण निर्माण झाली आहे.