मुंबई : राज्यातील तीन वर्ष विधी अभ्यासक्रमासाठीच्या यंदा जवळपास ९५ टक्के जागा भरल्या आहेत. आता सीईटी कक्षाने या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना २८ आणि २९ सप्टेंबर रोजी अर्ज भरता येणार आहे. राज्यात यावर्षी ३ वर्ष विधी अभ्यासक्रमाच्या १८० महाविद्यालयांमध्ये २१,०७१ जागा उपलब्ध आहेत. यामधील १९,९७० जागांवर विद्याथ्यर्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित केले आहेत.