मुंबई : मुंबई भाजपाचे अध्यक्ष अॅडव्होकेट आशिष शेलार यांनी एक एक्स पोस्ट केली आहे. ही पोस्ट बांगलादेशमधील ताज्या आणि भारतातील राजकारणाशी संबंधित आहे. काय म्हणाले आशिष शेलार पाहुयात...
बांगलादेशाची आर्थिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक सगळीच घडी उध्वस्त झाली.
तिथल्या हिंदूवर हल्ले केले जात आहेत. देशाची प्रतिके, हिंदू मंदिरे उद्धध्वस्त केली जात आहेत.
आपल्या देशाच्या दारापर्यंत ही संकटे येऊन ठेपली आहेत.
या सगळ्यात काही शक्तींचा मोठा वाटा आहे.
आपल्या देशात गेली दहा वर्षे ज्या पद्धतीने वातावरण निर्माण केले जातेय, त्यावरून "त्याच आंतरराष्ट्रीय शक्तींनी" आपले हस्तक भारतात पण नियुक्त केले तर नाही ना?
सावधान !! सावधान !!
संकट आपल्या दारात आणि संकटाचे हस्तक आपल्या घरात??