नवी मुंबई : नागर संस्कृतीपासून दूर व अलिप्त राहिलेले संबंधित प्रदेशातील मूळचे रहिवासी म्हणजे आदिवासी. एकविसाव्या शतकातील शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबईतही अनेक पाडे आहेत. यापैकीच एक असलेल्या नेरूळच्या उरणफाटा येथील डोंगर दऱ्याखालील आदिवासींना आता ५० लाखांच्या सीएसआर फंडातून पक्की घरे बांधून दिली जाणार आहेत.