मुंबई : मुंबई महापालिकेने पाच टक्के पाणीकपातीचा निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या निर्णयानुसार मुंबईत ३० मे २०२४ पासून ५ टक्के पाणीकपात लागू होणार आहे. पाऊस लवकर पडला नाही तर मुंबईत १० जूनपासून १० टक्के पाणीकपात सुरू होऊ शकते, असे संकेत महापालिकेने दिले आहेत.