Wednesday, October 02, 2024 12:51:26 PM

Maharashtra Farmers
शेतकऱ्यांना २३७ कोटींची भरपाई

राज्यात जून २०२४ ते ऑगस्ट २०२४ या कालावधीत अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांची हानीसाठी शेतकऱ्यांना भरपाई दिली जाणार आहे.

शेतकऱ्यांना २३७ कोटींची भरपाई

मुंबई : राज्यात जून २०२४ ते ऑगस्ट २०२४ या कालावधीत अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांची हानीसाठी शेतकऱ्यांना भरपाई दिली जाणार आहे. शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी राज्य शासनाने २३७ कोटी ७ लाख १३ हजार रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. हा निधी नियमानुसार वितरित केला जाईल. 

गडचिरोली जिल्ह्यासाठी ५७७२.४२ लाख, वर्धा जिल्ह्यासाठी ३६९१.७६ लाख, चंद्रपूर जिल्ह्यासाठी ७४२९.२२ लाख, नागपूर जिल्ह्यासाठी १८३६.५६ लाख,  पुणे जिल्ह्यासाठी ४५८.७१ लाख,  सातारा जिल्ह्यासाठी ८४.८६ लाख,  सांगली जिल्ह्यासाठी १११३.२५ लाख, अमरावती  जिल्ह्यासाठी ५१.०१ लाख, अकोला जिल्ह्यासाठी १२९०.१७ लाख, यवतमाळ जिल्ह्यासाठी ५४७.९६ लाख,  बुलढाणा जिल्ह्यासाठी १३५८.६६ लाख आणि वाशिम जिल्ह्यासाठी ७२.५५ लाख असा २३७ कोटी ७ लाख १३ हजार इतका निधी वितरीत करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान स्वरुपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते. तसेच, राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरिता देखील विहित दराने मदत देण्यात येते. केंद्र शासनाने विहित केलेल्या  नैसर्गिक आपत्तींव्यतिरिक्त राज्य शासनाने अवेळी पाऊस, अतिवृष्टी, वीज कोसळणे, समुद्राचे उधाण व आकस्मिक आग या  आपत्तींमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्याचे धोरण निश्चित केले असून सततचा पाऊस ही नैसर्गिक आपत्ती घोषित केली आहे.


सम्बन्धित सामग्री