केदारनाथ : महाराष्ट्राचे १२० यात्रेकरू केदारनाथ येथे अडकले आहेत. प्रतिकूल वातावरणामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीने महाराष्ट्राचे १२० यात्रेकरू केदारनाथ येथे अडकले आहेत. या यात्रेकरुंना सुरक्षितरित्या राज्यात परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्र शासन उत्तराखंड सरकारच्या संपर्कात आहे. उत्तराखंड सरकार केदारनाथ येथे अडकलेल्या सर्व यात्रेकरुंच्या सुटकेसाठी प्रयत्न करत आहे.