कल्याण : कल्याण येथील सहजानंद चौकातील एका भलमोठ लाकडी फलक शुक्रवारी सकाळी १० वाजून १८ मिनिटांनी पडले. या घटनेत २ जण जखमी झाले असून कोणतीही मनुष्यहानी झाली नाही. या फलक दुर्घटनेत तीन गाड्यांचे नुकसान झाले आहे. मनसैनिकांनी कल्याण डोबिंवलीतील फलकांच्या संदर्भात आयुक्तांकडे निवेदने दिली होती. निवेदन देऊनही आतापर्यंत अधिकाऱ्यांनी यावर कोणतीही कारवाई केलेली नाही.