Wednesday, April 02, 2025 06:51:02 PM

Crime News : ब्लॅकमेलिंगला कंटाळलेल्या महिलेनं असा काढला त्याचा 'काटा'

तो तिच्या घरी वारंवार येत असे. तो सतत ब्लॅकमेल करत असल्याने वाढत्या तणावामुळे त्याचा गळा दाबून खून केला, असे या महिलेने कबुलीजबाबात उघड केले आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस अधिकारी करत आहेत.

crime news  ब्लॅकमेलिंगला कंटाळलेल्या महिलेनं असा काढला त्याचा काटा

बरेली : कोणत्याही माणसाच्या सहनशक्तीला मर्यादा असते, हेच खरं. मात्र, अशा स्थितीत योग्य तो निर्णय घेणं आवश्यक असतं. नाहीतर, भावनेच्या भरात एखादं आपल्यालाच भोवणारं कृत्य घडून येऊ शकतं. अशाच एका महिलेच्या सहनशीलतेचा अंत झाला आणि तिनं तिला वारंवार त्रास देणाऱ्या व्यक्तीचा कायमचाच अंत घडवून आणला. या व्यक्तीकडून सतत मिळणाऱ्या धमक्या आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळून या महिलेनं टोकाचा निर्णय घेतला. या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून तिने गुन्ह्याचा कबुलीजबाब दिला आहे.

मृत व्यक्तीचं नाव इक्बाल असून चौकशीदरम्यान, महिलेने सांगितले की, त्या पुरूषाने तिच्या पतीला जीवे मारण्याची धमकी देऊन तिला जवळीक साधण्यास भाग पाडले होते. तिने पोलिसांना सांगितले की इक्बाल हा जरी-जरदोसी कारागीर होता. तो तिच्या घरी वारंवार येत असे. रवीना असं या महिलेचं नाव असून गेल्या दोन महिन्यांपासून ती इक्बालच्या नेहमी संपर्कात असल्याचे तिने सांगितले. तिने आरोप केला आहे की, इक्बालने तिला तिच्याशी जवळीक साधण्यास भाग पाडले होते आणि तिच्यासोबत झालेल्या संभाषणांचे रेकॉर्डिंग तिच्या पतीशी शेअर करण्याची धमकी दिली होती.

हेही वाचा - HIV पॉझिटिव्ह व्यक्तीकडून 17 वर्षीय मुलीचे अपहरण करून लैंगिक शोषण; तब्बल 10 महिने डांबून ठेवण्यात आईचीही साथ

उत्तर प्रदेश पोलिसांनी इक्बाल नावाच्या पुरूषाचा गळा दाबून खून केल्याच्या आरोपाखाली या महिलेला ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, इक्बालकडून सतत येणार्‍या ब्लॅकमेलिंग आणि धमक्यांमुळे ती महिला वैतागून गेली आणि शेवटी तिने हे कठोर पाऊल उचलले आणि त्याचे जीवन संपवले.

बरेलीचे ग्रामीण पोलीस अधीक्षक मुकेश चंद्र मिश्रा म्हणाले, "30 जानेवारी 2025 ला इक्बालचा मृतदेह घडसमस्तपूर गावातील त्याच्या राहत्या घराच्या पायऱ्यांवर आढळला. शवविच्छेदन अहवालात दोन्ही हातांनी गळा आवळल्यामुळे गुदमरून त्याचा मृत्यू झाल्याचे दिसून आले. गावातील रहिवासी इद्रिश आणि रवीना यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. चौकशीदरम्यान रवीनाने गुन्ह्याची कबुली दिली आणि गेल्या दोन महिन्यांपासून इक्बालच्या वारंवार संपर्कात असल्याचे उघड केले. तिने आरोप केला की इक्बालने तिला तिच्याशी जवळीक साधण्यास भाग पाडले होते आणि झालेल्या संभाषणांचे रेकॉर्डिंग तिच्या पतीशी शेअर करण्याची धमकी दिली होती."

ते पुढे म्हणाले, "घटनेच्या रात्री, रवीनाला हे माहीत होते की, इक्बाल घरी एकटा आहे, ती त्याला भेटायला गेली आणि त्याचा गळा दाबून खून करण्याची संधी साधली. त्यानंतर ती मृतदेह पायऱ्यांवर सोडून ती घरी परतली. दुसऱ्या दिवशी सकाळी पोलिसांना कळेपर्यंत ती घरीच होती." पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास करण्यास सुरुवात केली आहे.

हेही वाचा - Ayodhya Crime : अयोध्येत बेपत्ता तरुणीचा मृतदेह आढळला छिन्नविछिन्न अवस्थेत; योगी सरकारवर जोरदार टीका


सम्बन्धित सामग्री