लोकसभा सार्वत्रिक निवडणुका २०२४ मध्ये भाजपाने आपकी बार ४०० पार चा नारा दिला आहे. आपलं लक्ष पूर्ण करण्यासाठी भाजपा महायुतीमध्ये नवनवीन मित्र पक्षांना सोबत घेत आहेत. महाराष्ट्रातील ४५ अधिक जागा जिंकण्याचा निर्धार करणाऱ्या भाजपाने महायुतीत मनसेला सोबत घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यांची युती जवळपास निश्चितही झाली आहे. मात्र उत्तर भारतीय नागरिकांना मारहाण करणाऱ्या मनसे पक्षाच्या राज ठाकरे यांना युतीसोबत घेतल्यास मुंबईतील ९० लाख उत्तर भारतीय हे भाजपा विरोधी मतदान करतील असे उत्तर भारतीय विकास सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी म्हटलं आहे.