नवी दिल्ली, दि. १४ मार्च, २०२४ - केंद्र सरकारकडून येत्या ३० मार्च रोजी भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह, माजी पंतप्रधान नरसिंह राव, कृषी शास्त्रज्ञ एमएस स्वामीनाथन, बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर आणि भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न देण्याची घोषणा करण्यात आली आहे. भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. हा पुरस्कार अपवादात्मक आणि सर्वोच्च सेवेसाठी दिला जातो.