मुंबई, २ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : जगाला कुशल कामगारांचा पुरवठा करण्याची तयारी भारत सरकारकडून जोमात सुरू आहे. दरवर्षी ११केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाने, भविष्यात जगभरात ठिकठिकाणी निर्माण होणार असलेल्या कुशल कामगारांच्या आवश्यकतांचे मूल्यमापन सुरू केलेले आहे. प्रत्येक कौशल्याचे त्यानुसार प्रमाणीकरण केले जाईल. त्या अनुषंगाने सध्याच्या प्रशिक्षण पद्धतीत आवश्यक ते बदल केले जातील. तरुणांना परदेशातही रोजगाराच्या संधी मिळवून देऊ शकतील, असे हे बदल असतील.